औरंगाबाद,
दि. 19 : औरंगाबाद आणि नाशिक महसूल
विभागातील टंचाईसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाचे आज सायंकाळी
येथे आगमन झाले.
डॉ. मल्होत्रा
यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात कापूस विकास संचनालयातील संचालक डॉ. आर. पी.
सिंग, केंद्रीय उर्जा मंत्रालयातील वीज प्राधिकरणाचे उपसंचालक शंतनु विश्वास, निती
आयोगातील उपसल्लागार मानस चौधरी, केंद्रीय अन्न धान्य महामंडळातील वरिष्ठ अधिकारी एम.
एम. बोऱ्हाडे, केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयातील वरिष्ठ सहआयुक्त सतीश कामभोज, केंद्रीय
पशुसंर्वधन विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ. एच. आर. खन्ना, केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता
मंत्रालयातील अवर सचिव के. नारायण रेड्डी, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातील सहाय्यक
आयुक्त जगदीश कुमार आणि केंद्रीय वित्त मंत्रालयातील उपसंचालक ए. के. दिवाण यांचा समावेश
आहे.
या पथकातील
विविध सदस्य शुक्रवार,दि. 20 आणि शनिवार,दि.21 नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील आठ
जिल्हयांचा तसेच नाशिक विभागातील बुलढाणा, जळगांव, धुळे, नाशिक आणि अहमदनगर जिल्हयांचा
दौरा करणार असून परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
दौऱ्यासाठी पथकाच्या चार तुकड्या करण्यात आल्या आहेत.
आज रात्री
झालेल्या बैठकीला औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी
अभिजित चौधरी, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुहास दिवसे, महसूल उपायुक्त
जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, बुलढाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी
शिवानंद टाकसाळे यांच्यासह कृषी, पशुसंर्वधन, भुजलसर्वेक्षण आदि विभागांचे वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा